‘सरदार’, ‘लोह पुरुष’ या विशेषणांची वैशिष्ट्ये वल्लभभाई पटेल यांच्यात लहानपणापासूनच होती. यांच्यातील नेतृत्वाची चुणूक शालेय जीवनात दिसली होती. गुजरातमधील खेडा जिल्ह्यात राहणारे वल्लभभाई शाळेत असताना स्वभावाने खट्याळ व वृतीने बंडखोर होते. अन्यायाविरुध्द ते आवाज उठवत. इंग्रजी शिक्षण घेऊन ते वकिलीकडे वळले. निष्णात वकील म्हणून प्रसिद्धीला आल्यानंतर कालांतराने ते राजकारणाकडे वळाले.
गांधीजींनी १९१६ मध्ये चंपारणचा सत्याग्रह सुरू केला होता. शेतकरी- कामकरी यांचे दु:ख जाणून घेण्याची गांधीजींची वृत्ती अन् अन्यायाच्या नि:शस्त्र प्रतिकारासाठी सत्याग्रहाचे उचललेले पाऊल वल्लभभाई भावले व ते गांधीजींच्या निकट आले. बारडोलीचा सत्याग्रह तर त्यांच्याच नेतृत्वाखाली यशस्वी झाला. तेव्हापासून वल्लभभाई ‘सरदार’ झाले, अशी माहिती ‘सरदार पटेल’ या जीवनकथेतून कृ. भा. परांजपे यांनी दिली आहे.
भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात व नंतर स्वतंत्र भारताची घडी नीट बसावी यासाठी वल्लभभाईंनी अथक प्रयत्न केले. संस्थाने विलीनीकरणात तर त्यांची भूमिका मोलाचीच होती. या सर्व इतिहासाची उजळण या पुस्तकातून होते.
पुस्तक : सरदार पटेल
लेखक : कृ. भा. परांजपे
प्रकाशक : ॠचा प्रकाशन
पाने : ३०४
किंमत : ३८० रुपये
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)